मुलांसाठी प्रजासत्ताक दिन
- प्राजक्ता देशपांडे
२६ जानेवारी हा एका राष्ट्रीय सणासारखा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस देशभक्ती, एकता आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव. पण काय आहे ह्या दिनाचे महत्व? या Blog द्वारे जाणून घेऊ या, सोप्या शब्दात.
प्रजासत्ताक दिन काय असतो?
दरवर्षी २६ जानेवारीला आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या दिवशी, १९५० साली, भारताचा संविधान लागू झालं आणि आपला देश प्रजासत्ताक झाला
प्रजासत्ताक म्हणजे सत्ता प्रजेच्या हातात. म्हणजे असा देश जिथं लोक स्वतःचे नेते निवडतात. जे लोक आपल्यासाठी, समाजासाठी चांगले विचार करतील, विकास घडवून आणतील अशा लोकांना elections मधे मत देऊन आपण आपला नेता ठरवतो.
प्रजासत्ताक दिन आपले स्वातंत्र्य आणि लोकशाही साजरी करण्याचा दिवस आहे. हा दिवस स्वातंत्र्यासाठी झटलेल्या लोकांना आठवण्याचा आहे. तसेच हा दिवस भारताचे नागरिक म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा आहे.
संविधान (Constitution) म्हणजे काय?
भारताला 15 ऑगस्ट 1947, रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पण देश चालवायचा कसा? त्यासाठी काही Rules वगैरे लागतील ना? हेच Rulesची नियमावली म्हणजे आपले संविधान. देश स्वतंत्र झाल्यावर संविधान तयार करण्यासाठी एक समिती (committee) स्थापन करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समितीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं. आपला इतका मोठा देश आणि त्याचं इतकं मोठं संविधान लिहिण्यासाठी थोडे नाही तर चक्क ६ महिने लागले आणि म्हणूनच आपल्या देशाचं संविधान जगातील सगळ्यात मोठं संविधान (Constitution) आहे.
प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात?
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी भारताची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती, राजपथवर राष्टीय ध्वज फडकवतात आणि नागरिकांना संबोधून भाषण करतात. राजपथावर भव्य लष्करी परेड आयोजित केली जाते. यात देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांची परेड, लढाऊ विमानांचे हवाई प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात. भारतातील विविध राज्य आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करतील त्या चित्ररथाचे संचलन सुद्धा या परेड मध्ये असते.
या शिवाय वर्षभरात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या १६ वर्षाखालील बालकांना शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. ह्या मुलांचे कौतुक करायला त्यांना हत्तीवर बसवून Parade मध्ये शामिल करवतात.
दिल्लीप्रमाणे देशाच्या इतर राज्यात सुद्धा राज्यपाल ध्वज फडकवतात आणि त्या त्या राज्यातील लोकांना संबोधित करतात.
शाळा आणि महाविद्यालय, सोसायट्यांमध्ये सुद्धा राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो. विद्यार्थी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि नाटक सादर करतात. देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेवर आधारित अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात.
कित्येक गावांमध्ये आजही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रभात फेरी काढली जाते.
लहान मुलांबरोबर प्रजासत्ताक दिन कसा साजरा करता येईल?
-
लहान मुलांमध्ये प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व पटवून देण्याचा मार्ग म्हणजे वेगवेगळी गोष्टी आणि गाणी. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी सांगून आपल्याला लहान मुलांना त्यांच्या कामाबद्दल माहिती देता येईल.
-
प्रजासत्ताक दिनाच्या निम्मिताने होणाऱ्या वक्तृत्व, चित्रकला, इतर खेळाच्या स्पर्धामध्ये आवर्जून भाग घ्यायला लावणे.
-
मुलांना आवर्जून शाळेत होणाऱ्या झेंडावंदनाला घेऊन जाणे.
-
मुलांना आपल्या शहरातील किंवा शहरा जवळील ऐतिहासिक ठिकाण दाखवणे. उदा: किल्ला, स्वातंत्र्यसैनिकाचे स्मारक, ऐतिहासिक संग्रहालय
-
मुलांबरोबर घरी राहून तुम्ही दिल्ली मध्ये होणारी परेड बघू शकता.
-
मुलांना या दिवशी देशभक्तिपर पुस्तके भेट देऊ शकता (चिकूपिकू भारत विशेषांक)
-
आजकाल समाजात काही घटक प्रजासत्ताक दिन काही सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. स्वच्छता अभियान राबवून परिसराची स्वच्छता केली जाते. तसेच अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी मोफत सामाजिक सेवा करून गरजू लोकांना मदत केली जाते.
- आपण मुलांना घेऊन अशा उपक्रमध्ये सहभागी होऊ शकतो.
प्रजासत्ताक दिन हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांचा आधारस्तंभ आहे. या दिवशी आपण स्वातंत्र्यसैनिकांना वंदन करतो आणि आपल्या देशाच्या संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेतो. आजच्या काळात विविधतेने नटलेल्या आपल्या या देशात हा दिवस आपल्याला विविधतेत एकता साधण्याचा संदेश देतो.
या दिवशी आपण आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्याची शपथ घेऊया. आपण आपल्या शिक्षणात लक्ष केंद्रित करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि आपल्या समाजाच्या विकासासाठी काम करूया. या देशाला उज्ज्वल भविष्य देण्यासठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करूया. जय हिंद!"
Read More blogs on Parenting Here